15 आणि 16 फेब्रुवारी रोजी पूर्व विदर्भातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. चांदवड तालुका, अमरावती जिल्ह्यातील काही भाग, आकोट, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
16 फेब्रुवारीपासून राज्याच्या उर्वरित भागात पुढील 13 दिवसांपर्यंत लवकर पाऊस पडण्याची शक्यता नाही.
29 फेब्रुवारी ते 4 मार्च: पुन्हा पावसाची शक्यता
या काळात राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची हरभरा, तूर आणि गहू यांची काढणी राहिलेली आहे. अशा शेतकऱ्यांनी 29 फेब्रुवारीच्या आत पिकांची काढणी करून घ्यावी. तसेच योग्य त्या ठिकाणी पिके झाकून ठेवावी असा कृषी सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला.
29 फेब्रुवारीनंतर पावसाची शक्यता:
29 फेब्रुवारी नंतर राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे. तसेच उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात 21 आणि 22 तारखेला फक्त ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण:
पश्चिम महाराष्ट्रात 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सूचना:
- 29 फेब्रुवारीच्या आत हरभरा, तूर आणि गहू यांची काढणी पूर्ण करा.
- योग्य त्या ठिकाणी पिके झाकून ठेवा.
- 29 फेब्रुवारीनंतर पावसाची शक्यता असल्याने खबरदारी घ्या